गुरुवार, २३ मार्च, २०१७

म. टा.


'वर्तमानपत्रातील सर्वात वाचनीय गोष्ट म्हणजे अग्रलेख' हे बाळकडू आम्हाला पाजणारे, वृत्तपत्रीय लिखाणाचा वस्तुपाठ घालून देणारे आणि 'पत्र नव्हे मित्र' या बिरुदाने महाराष्ट्र टाईम्सला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवणारे तळवलकर सर केवळ मटालाच नाही तर अवघ्या पत्रकारितेला पोरके करून गेले. निर्भीड, निष्पक्ष, मार्मिक, विचक्षण, मर्मग्राही, साक्षेपी, द्रष्टा तथा व्यासंगी ही विशेषणांची रत्नमाला ज्यांच्या गळी शोभावी अशी; जांभेकरांपासून सुरु होऊन, आगरकर, गोखले, टिळकांनी आचार्यांकडे सोपवलेली मराठी बाण्याच्या पत्रकारितेची परंपरा आज अगदी खंडित झाली नसली तरी स्तब्ध झालीय एवढे नक्की! आजच्या डिजिटल युगातही वर्तमानपत्राशीवाय दिवस सुरु न होणाऱ्या आमच्या पिढीला या संस्कारकर्त्याची उणीव सदोदित भासेल... गुरुतुल्य श्री. गोविंद तळवलकर सरांना अखेरच्या दंडवताची मन:पूर्वक शब्दसुमनांजली!

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा