बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

लाजरा...!


राजेंद्रकुमार ते सुनील दत्त असल्या न-नटांचे पडद्यावरील दर्शन जिच्या चेहऱ्यातल्या गोडव्याने आणि सहज अभिनायातल्या नजाकतीने सुसह्य केले ती '…बहारोंकी मलिका…' पडद्याआड जात नाही तोवर 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा'यला आसुसलेला कवि ज्याचा '… तुमचं आमचं सेम असतं…' हा विश्वास आम्हाला मजनू व्हायची हिम्मत देऊन गेला… त्यानेही त्याच्या कवितेइतक्याच सहजतेने निरोप घेतला. दृश्यानुभव जरी संग्रहित स्वरुपात शिल्लक असला तरी जिवंत श्रवणानुभव आता पुन्हा नाही आणि पु. लं. चे किस्से 'पीएल असा होता…' सांगणारा आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला शेवटचा माणूसही…


यांनी आम्हांस काय दिले याची जंत्री मोठी असली तरी एका शब्दात सांगायचे तर… आनंद!
आमचे जगणे अनेक तऱ्हेने समृध्द करून गेलेल्या या दोन कलावंतास शब्दसुमनांजली…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा