गुरुवार, २१ मे, २०१५

इतिश्री...!


जगणे फुलून यावया
जाणिवांनी गहिरे व्हावे
विभ्रमांनी ऊन्मळून
विषादांना बहिरे व्हावे…!

मंगळवार, १९ मे, २०१५

अरुणाष्टके...!



जळत ह्रदय माझें कोट्यानुकोटी।
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं॥
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू।
षड्‌रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥

जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे।
पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे॥
जळधरकण आशा लागली चातकासी।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥

विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं।
कुळाभिमानें पडिलों प्रवाहीं॥
स्वहीत माझें होतां दिसेना।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥

मानवतेच्या अविरत सेवेसाठी परिचारिकेचे असिधारा व्रत स्वीकारलेल्या पण बधीर समाजाच्या सडक्या मनोवृत्तीमुळे नरकयातना भोगणाऱ्या अरुणा शानभाग यांचे काल लौकिक अर्थाने निधन झाले…
मृत्यूशी ४२ वर्षे लढणाऱ्या आणि त्यांच्या त्या अवस्थेत समाजभान, सहानुभूती आणि विवेक जागृत ठेवून ऋणानुबंध जपणाऱ्या त्यांच्या सर्व परिचारिका भगिनींना… सलाम!